'कलर्स मराठी' वरील 'सूर नवा ध्यास नवा – आवाज तरूणाईचा' या शोचा यावर्षीचा सीजन अगदी जोरदार सुरू आहे.

प्रेक्षकांचा या शो ला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.

या शो ची सूत्रसंचालिका अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil) ही आहे. 

तर परीक्षक आहे प्रसिद्ध गायक महेश काळे (Mahesh Kale) आणि अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte).

या स्पर्धेत 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतील अभिमन्यू म्हणजेच अभिनेता समीर परांजपे हा सुद्धा एक स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. 

त्याने आपल्या आवाजाने परीक्षकांसह प्रेक्षकांची सुद्धा मने जिंकली. पण काही दिवसांपूर्वीच तो या शो मधून बाहेर पडला.

आता या शो चे Top 6 स्पर्धक निवडले गेले आहे.

आणि शेवटी या Top 6 स्पर्धकांपैकी एकाची 'महागायक' म्हणून निवड होईल. म्हणजेच तो या सीजनचा विजेता ठरेल.

तर या शो चे अंतिम Top 6 स्पर्धक आहे 'अनिमेष ठाकूर, मृण्मयी भिडे, आदिश तेलंग, अनुष्का शिकतोडे, अंतरा कुलकर्णी आणि गोपाळ गावंडे.

या Top 6 पैकी कोण होईल या सीजनचा विजेता? हे या शोच्या महाअंतिम सोहळ्यात स्पष्ट होईल.