Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना डिसेंबर नंतर बंद होणार..

ladki bahin yojana

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पहिले दोन हफ्ते म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे एकत्रित ३०० रुपये अनेक महिलांच्या बँक खात्यात जमा झाले. त्यांनतर आता लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम सुद्धा सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे महिलांची प्रतिक्षा संपणार आहे. ही बातमी ऐकल्यावर अनेक महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले आहे.

महिलांसाठी धक्कादायक बातमी

असे असले तरी, महिलांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अर्थतज्ज्ञ डॉ. नीरज हातेकर यांनी सांगितले आहे की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना डिसेंबरमध्ये बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या योजनेवर अवलंबून असलेल्या लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसू शकतो.

महाराष्ट्रातील महायुती सरकारने मोठा गाजावाजा करत ही योजना सुरु तर केली पण या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर मोठा भार पडला आहे. त्यात आता इतर योजनांचे पैसे देखील या योजनेत वळवल्याचे दिसत आहे. सरकारकडे पुरेसा पैसा नसतांना सुद्धा ही योजना सुरु का केली असा अगोदरच अनेक अर्थतज्ञांचा प्रश्न होता. पण आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने ही योजना सुरु केली हे स्पष्ट आहे. या योजनेमुळे असंख्य गरीब महिलांना फायदा झाला. पण यात गरीब महिलांच्या नावाने काही चुकीच्या व्यक्तींनी सुद्धा फॉर्म भरले आणि योजनेत भ्रष्टाचार केला. जे पात्रता निकषामध्ये बसत नाही अशा महिलांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतल्याने आता सरकारने काही कठोर पाऊले उचलत नवीन फॉर्म ऑनलाईन घेण्याचे बंद केले. आता फक्त अंगणवाडी सेविकांकडेच नवीन फॉर्म स्विकारले जातील. तसेच आतापर्यंत अनेक महिलांनी निकषात बसत नसून सुद्धा या योजनेचा फॉर्म भरला आणि त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला, त्यामुळे आता या योजनेचा पुन्हा एकदा रिव्ह्यू होणार आहे.

डिसेंबरमध्ये होणार योजनेचा पुनरावलोकन

सरकार या योजनेचा रिव्ह्यू डिसेंबरमध्ये घेणार आहे. डॉ. नीरज हातेकर यांच्या मते, लाडकी बहिण योजनेचे पात्रता आणि अपात्रतेचे नवीन निकष डिसेंबरपर्यंत लागू केले जातील, त्यानंतर योजनेचे भवितव्य ठरवले जाईल. त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले की, नवीन निकषानुसार डिसेंबरमध्ये बऱ्याच महिलांना अपात्र घोषित केले जाईल.

योजनेच्या सातत्याबद्दल प्रश्नचिन्ह

अर्थतज्ज्ञ हातेकर यांनी सांगितले की, सरकारला अशा योजना दीर्घकाळ चालवता येणार नाहीत. नवीन सरकार आल्यास या योजनेत मोठे बदल केले जातील आणि हळूहळू ही योजना बंद होईल, असे त्यांचे मत आहे.

अर्ज मंजूर महिलांसाठी खुशखबर

ज्या महिलांनी 31 जुलैच्या आधी अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले होते, त्यांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झाला होता. या योजनेत दरमहा 1500 रुपये दिले जातात. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता, म्हणजे 1500 रुपये, लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.

नवीन अर्जदार महिलांसाठी संधी

ज्या महिलांना 31 जुलैपूर्वी अर्ज करता आला नव्हता किंवा ज्यांचे अर्ज मंजूर झाले नव्हते, त्यांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित 4500 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांना एकही हप्ता मिळाला नाही, त्यांना तीन महिन्यांच्या हप्त्याचे पैसे एकाच वेळी मिळणार आहेत.

लाडक्या बहिणींना मिळणार दिवाळी गिफ्ट

लवकरच महाराष्ट्रात निवडणुका होणार आहे. त्यामुळे सर्व महिलांना खुश करण्यासाठी महायुती सरकार लाडक्या बहिणींना दिवाळी गिफ्ट म्हणून पुढील तीन महिन्यांचे पैसे अगोदरच देण्याच्या तयारीत आहे. यात ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा तीन महिन्यांचे एकत्रित पैसे ४५०० रुपये हे अडवान्समध्ये ऑक्टोबर महिन्यातच दिले जाऊ शकतात. पण हा प्रस्ताव अजून मंजूर झाला नाही. लवकरच या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बैठक बोलावून या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेतील.

डिसेंबर नंतर योजना बंद होण्याची शक्यता

लाडकी बहिण योजनेमार्फत सर्व पात्र महिलांना दिल्या जाणाऱ्या या आर्थिक सहाय्याचा लाभ डिसेंबरपर्यंत व्यवस्थित मिळण्याची शक्यता आहे. पण डिसेंबरनंतर या योजनेबद्दल काय निर्णय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. लगेचच ही योजना बंद केली तर सरकारवर खूप टीका होईल आणि असंख्य महिला नाराज होतील त्यामुळे डिसेंबर नंतर नवीन पात्रता ठरवून अनेक महिलांना अपात्र केले जाण्याची शक्यता आहे, यानंतर हळूहळू ही योजना बंद करण्याच्या दिशेने पाऊले उचलले जातील असं मत अर्थतज्ञांचे व्यक्त केले आहे.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top