अभिनेते रवींद्र महाजनी आणि रंजना यांच्या अफेअर बाबत पत्नी माधवीचा खुलासा | Ravindra Mahajani and Ranjana affair?

Ravindra Mahajani and Ranjana affair 3

Ravindra Mahajani and Ranjana affair?: जेष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाला आता काही महिने झाल्यानंतर त्यांच्या पत्नी माधवी यांचे आत्मचरित्र ‘चौथा अंक’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात माधवी यांनी अनेक त्यांच्या अनेक चांगल्या-वाईट आठवणी शेअर केल्या आहे. पण यात अभिनेते रवींद्र महाजनी यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. यात रवींद्र महाजनी यांचा प्रेमभंग झाल्यानंतर त्यांना व्यसन करण्याची आणि जुगाराची सवय लागली होती, तसेच त्यांचा रागट स्वभाव आणि ते पत्नी माधवीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण करत असे अनेक खुलासे माधवी महाजनी यांनी त्यांच्या या पुस्तकात केले आहे. (madhavi mahajani about ravindra mahajani and actress ranjana affair)

रवींद्र महाजनी यांच्याबद्दलच्या चांगल्या आठवणी

पण यासोबतच माधवी यांनी रवींद्र महाजनी यांच्याबद्दलच्या काही चांगल्या आठवणी सुद्धा शेअर केल्या आहे. यापैकीच एक आठवण रवींद्र महाजनी आणि अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या जोडीबद्दल. त्यावेळी रवींद्र महाजनी आणि रंजना यांची ही जोडी सुपरहिट झाली होती. तेव्हा त्यांच्या अफेअरच्या चर्चाही सुरु झाल्या होत्या. पण यामागचे सत्य काय हे आता माधवी महाजनी यांनी त्यांच्या या पुस्तकात सांगितले आहे.

माधवी यांनी त्यांच्या या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे चित्रपटातून जसजसे रवींद्र महाजनी यांना काम मिळत गेले तसतसे त्यांनी जुगार खेळणे बंद केले होते. खरं तर रविंद्र महाजनी चित्रपटातून काम करत असताना जेवढे पैसे कमवायचे ते सगळे पैसे पत्नी माधविकडे आणून द्यायचे. झुंज चित्रपटानंतर त्यांना मराठीतील आघाडीचा नायक म्हणून ओळख मिळाली होती. त्यामुळे जुगारापेक्षा त्यांना आता लोकप्रियतेचे व्यसन जडले होते. चित्रपटाच्या व्यस्त शेड्युलमधून जेव्हा ते घरी यायचे तेव्हा ते माधवी सोबत भरपूर गप्पा मारत वेळ घालवायचे. मुलांना, बायकोला, नातेवाईकांना सगळ्यांवर ते मनसोक्त खर्च करायचे. रविंद्र महाजनी यांच्या व्यसनाचा भाग सोडला तर ते दिलखुलास व्यक्तिमत्त्व होतं. एवढा देखणा नायक असूनही चित्रपटात सुंदर नायिकांसोबत काम करताना त्यांचे पाऊल कधीही चुकीच्या मार्गाने पडले नाही. सुंदर सुंदर मुलींचा गराडा त्यांच्याभोवती सतत असायचा पण त्यांच्या पासून ते चार हात लांब असायचे.

रवींद्र महाजनी आणि रंजना यांचे अफेअर?

अभिनेत्री रंजना आणि रविंद्र महाजनी यांची जोडी मोठ्या पडद्यावर तुफान गाजलेली पाहायला मिळाली. या जोडीने अनेक चित्रपटात एकत्रित काम केले. ‘जाणता अजाणता’ हे रविंद्र महाजनी यांचे पहिले नाटक खूप गाजले होते. व्ही शांताराम त्यावेळी झुंज चित्रपटासाठी तगड्या नायकाच्या शोधात होते. हे नाटक पाहिल्यानंतर त्यांना रविंद्र महाजनीच चित्रपटासाठी योग्य आहेत असे वाटले. यात त्यांची नायिका होती रंजना . ‘कोण होतास तू, निसर्ग राजा ऐक सांगते’ ही चित्रपटातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली. या भूमिकेसाठी रविंद्र महाजनी यांना फिल्म फेअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. ‘लक्ष्मी , मुंबईचा फौजदार’ चित्रपटांद्वारे रंजना आणि रविंद्र यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसली. ‘गोंधळात गोंधळ’ या चित्रपटात रंजना असली तरी प्रिया तेंडुलकर सोबत रविंद्र महाजनी यांना संधी मिळाली होती. रविंद्र महाजनी आणि रंजना ही जोडी सुपरहिट झाल्यानंतर या दोघांना अनेक चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या.

अभिनेत्री रंजना आणि रविंद्र महाजनी यांच्याबद्दलची एक आठवण सांगत माधवी यांनी त्यांच्या या पुस्तकात लिहिलंय की “रंजना व रवीला एकत्र पिक्चर्स मिळू लागले. त्यांची जोडी हिट ठरली होती. तेव्हा रंजनाने एकदा रवीला सुचवले की, आपल्या दोघांनाच सर्वांत जास्त चित्रपट मिळावेत म्हणून मधुला विश्वासात घेऊन आपण आपले अफेअर चालले आहे असे उठवूया. म्हणजे आपल्याकडे जास्तीत जास्त सिनेमे येतील. माझी हरकत नव्हती पण रवीने ते मान्य केले नाही.” असं माधवी यांनी लिहिले आहे.

रविंद्र महाजनी हे पत्नीच्या बाबतीत एकनिष्ठ

माधवी यांच्या या खुलास्यावरून असं दिसतंय की अजून चित्रपट मिळवण्यासाठी अभिनेत्री रंजनाने अभिनेते रविंद्र महाजनी सोबत अफेअरच्या चर्चा रंगवण्याचे ठरवले होते. आणि यात ती बऱ्या पैकी ती यशस्वी सुद्धा झाली कारण अनेक लोक त्यांच्या अफेअरच्या चर्चा अजूनही करतांना दिसतात. पण माधवी यांच्या खुलास्यानुसार अभिनेते रवींद्र महाजनी यांचा या अफेअरच्या गोष्टीस विरोध होता. रविंद्र महाजनी हे कामाच्या बाबतीत आणि पत्नीच्या बाबतीत एकनिष्ठ होते.

अभिनेते रवींद्र महाजनी यांची अजून एक आठवण सांगत माधवीने म्हटलंय की त्यांच्यासोबत काम करणारी एक नायिका त्यांच्या प्रेमात पडली होती . तेव्हा ती नायिका थेट रविंद्र महाजनी यांच्या घरी पोहोचली होती. पण रविंद्र महाजनी परक्या स्रियांपासून खूप लांब राहत होते. ती इथे का आली किंवा तिला माझा पत्ता कसा कळला हेही ते पत्नीला बोलून दाखवत असत. त्यामुळे रविंद्र महाजनी यांची ही बाजू जमेची ठरली होती. एवढा देखणा नायक असूनही ते आपल्या पत्नीशी कायम एकनिष्ठ राहिले.

अभिनेत्री रंजनाचा अपघात आणि करिअर संपुष्टात

अभिनेत्री रंजना देशमुख (Actress Ranjana Deshmukh) विषयी सुद्धा माधवी यांनी एक आठवण शेअर केली आहे. रंजना ही त्याकाळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. रवींद्र महाजनी आणि नंतर अशोक सराफ यांच्यासोबत तिचे नाव जोडले जायचे. खूप कमी वयात रंजनाने अभिनयक्षेत्रात ही प्रसिद्धी मिळवली होती. पण एका अपघाताने त्यांचे पूर्ण आयुष्यच बदलून गेले. रंजना 1987 मध्ये झुंजार या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बंगलोरला जात होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यांचे दोन्ही पाय निकामी जाले. त्यांचा डावा हातही निकामी झाला. त्यावेळी रंजना केवळ 32 वर्षांच्या होत्या. रंजना या अपघातानंतर आयुष्याची शेवटची 13 वर्षं ही व्हीलचेअरवर काढली. पुढे रंजना खचत गेल्या आणि 2000 मध्ये परेल येथील त्यांच्या घरी वयाच्या 45 व्या वर्षी त्यांचे हृदय विकाराने निधन झाले.

रंजना विषयी एक आठवण सांगत माधवी महाजनी यांनी म्हटलंय की “रंजना नेहमी इतरांना सांगायची की, गाडीत बसताना ड्रायव्हरच्या मागे कधीही बसू नये. कारण अपघात झाला तर ड्रायव्हर व त्याच्यामागे बसलेल्या माणसाला सगळ्यात जास्त धोका असतो. एकदा पहाटे ती तिच्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी निघाली होती. अर्थातच रंजना ड्रायव्हरच्या मागे बसलेली नव्हती. अजून पूर्ण उजाडलेले नव्हते. वेगात असलेली गाडी अचानक एका झाडाला धडकली. या अपघातात कुणाला खरचटलंसुद्धा नाही. रंजनाचे मात्र दोन पाय या अपघातात गेले आणि तिचं चित्रपटातलं करिअर संपुष्टात आलं.” असं माधवी यांनी त्यांच्या ‘चौथा अंक’ (Chautha Ank) या पुस्तकात लिहिले आहे.

chautha anka book
1Our Pick
‘चौथा अंक’

माधवी रवींद्र महाजनी यांचे आत्मचरित्र

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top