Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी केली जाणार असल्याच्या बातम्या सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, या व्हायरल बातम्यांमध्ये वेगवेगळे कारणे देत अनेक लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळले जाणार असल्याचे म्हटले आहे. पण या व्हायरल बातम्या मागची सत्यता काय? तर नुकतंच माजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत खरी माहिती सांगितली आहे.
आदिती तटकरे या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी करण्याबाबत म्हणाल्या आहे की “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवत असताना आम्ही ती योजना अगदी व्यवस्थितपणे राबवण्याचा प्रयत्न केला आहे. 2 कोटी 40 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. कोणत्याही योजनेची एवढ्या मोठ्या संख्येने छाननी केली जाणार नाहीये. त्यासाठी मुळात तक्रार याव्या लागतात. मी आता सध्या त्या विभागाची मंत्री नाही. तेव्हा आता अशा पद्धतीने तक्रार आली असेल तर माझ्याकडे त्याबद्दलची माहिती नाही. छाननी किंवा चाचणी करायची झाल्यास तक्रारीच्या आधारे करावी लागते. कोणी तक्रारी केल्या तर त्या तपासल्या जातील. मी मंत्री असताना अशा तक्रारी आल्या नव्हत्या. आत्ता 1 ते दीड महिन्याच्या काळात आल्यात की नाही ते मला माहिती नाही. कोणीही अशा पद्धतीने तक्रार केली असेल तर विभागाचे आधिकारी निर्णय घेतात. आम्ही तेव्हाच अतिशय प्राथमिक छाननी करून आधार सिडिंग करून लाभार्थी निवडले आहेत. त्यामुळे पुढच्या कालावधीत ही योजना अधिक चांगल्या पद्धतीने राबवताना जर छाननी करायची असेल तर तक्रारींच्या आधारावरच केली जाईल. भविष्यात अशी छाननी होणार आहे की नाही याबाबत मी आत्ता भाष्य करू शकत नाही.” असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
एकंदरीत 2 कोटी पेक्षाही जास्त महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळत आहे. त्यामुळे या सर्व महिलांच्या फॉर्मची पुन्हा पडताळणी करणे शक्य नाही, फक्त ज्या महिलांनी अपात्र असतांनाही लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याची तक्रार येईल त्याच महिलांचे फॉर्म पुन्हा चेक करून त्या महिलांना पात्र किंवा अपात्र ठरवले जाईल.
(ladki bahin yojana, aditi tatkare, ladki bahin yojana update, ladki bahin yojana scrutiny,)