Ravindra Mahajani: मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वांत देखणे आणि रुबाबदार अभिनेते रवींद्र महाजनी हे होते. आजही त्यांचा देखणेपणाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नी माधवी यांनी ‘चौथा अंक’ या पुस्तकात रवींद्र महाजनीं बद्दल अनेक खुलासे केले आहे. यामुळेच काही चैनेलने त्यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत सुद्धा माधवी यांनी रवींद्र महाजनीं बद्दल काही खुलासे केले आहे. यातीलच एक खुलासा रवींद्र महाजनींच्या अफेअर्स बद्दल आहे.
नुकतंच माधवी महाजनी यांनी ‘आरपार’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना “रवींद्र महाजननींना तुमच्याबाबत असुरक्षितता वाटली आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देतांना माधवी म्हणाल्या की “हो. रवीला माझ्याबाबत खूपच असुरक्षितता वाटायची. त्याचा पुढे मला त्रास झाला. त्याच्या आयुष्यात इतक्या सुंदर बायका असूनही त्याला माझ्याबाबत असुरक्षितता वाटणे हे आश्चर्यच आहे. त्याला मी सुंदर नाही आहे असं कधीच वाटलं नाही. लग्नानंतर रवींद्र यांनी मला पावडर, लिपस्टिक किंवा मेकअप करू दिला नाही.
“त्याचा एखादा मित्र माझ्या बाजूला बसलेलाही त्याला चालायचं नाही. एरव्ही रवींद्र, माझ्या सासू आजूबाजूला असताना किंवा पार्टीमध्ये वगैरे बसलेलं त्याला चालायचं. पण मी बसले असताना त्याचा कुणी मित्र आला आणि जवळपास जागा असतानादेखील तो माझ्या इथे बसला तर त्यांना ते आवडायचं नाही. रवींद्र त्या मित्राशी हळहळू मैत्री तोडून टाकायचा. इतकं त्याला माझ्या बाबतीत असुरक्षित वाटायचं. मी रवींद्र महाजनी आणि ही माझी बायको आहे हा याबाबत त्याला अभिमान होता.” असं माधवी यांनी म्हटलंय.
पण यापुढे त्यांनी रवींद्र महाजानींचे बाहेर काही अभिनेत्रींशी अफेअर असल्याचे सुद्धा म्हटले आहे. याबाबत माधवी म्हणाल्या की “पण मी रवींद्रबाबत कधीही असुरक्षित झाले नाही. त्यांचे सिनेमातील बायकांशीच अफेअर्स होते, मी आता त्यांची नावे घेऊ शकत नाही. पण त्यावेळी त्यांच्यात काही समस्या निर्माण झाली तर त्या समस्या मीच सोडवल्या होत्या. त्या आमच्या घरी येऊन मला सांगायच्या की आम्ही लग्न करतो, आपण एकत्र राहुया असं म्हणायच्या. त्यावर मी त्यांना म्हणायचे की माझी सासूबाईंना हे अजिबातच चालणार नाही. त्यामुळे तुम्ही मला कितीही सांगितलं तरी त्याचा काही उपयोग नाही. रवींद्रही त्यांच्या गळ्यापर्यंत गोष्टी आल्यावर माझ्याकडे घेऊन यायचे आणि मीही त्या निस्तरायचे.” असा खुलासा माधवी महाजनी यांनी या मुलाखतीत केला आहे.
‘चौथा अंक’
माधवी रवींद्र महाजनी यांचे आत्मचरित्र