Karisma Kapoor: 90 दशकात भारतातील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर. तिच्या कमाल अदांनी असंख्य तरुण घायाळ होत असत. अभिनेता गोविंदा सोबत तर तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले होते. त्या काळात लाखो दिलांची धडकन म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूर असं म्हटलं जायचं. पण आता मात्र अभिनेत्री करिश्मा ही तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तिच्या वयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. सध्या तिने तिच्या पतीवर अत्यंत गंभीर आरोप केलेय ज्याची सध्या खूप चर्चा होतेय. (Bollywood actress Karisma Kapoor makes serious allegations against her husband businessman Sanjay Kapur)
अभिषेक बच्चन सोबत साखरपुडा
अभिनेत्री करिश्मा कपूर हिचे उद्योगपती संजय कपूर (Sanjay Kapur) सोबत लग्न झाले होते. पण संजय कपूर सोबत लग्न होण्या अगोदर करिश्माचा अभिनेता अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन याच्या सोबत साखरपुडा झाला होता. पण काही कारणांमुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही.

करिश्माचा खऱ्या आयुष्यात झाला घटस्फोट
त्यानंतर करिश्माने 2003 मध्ये उद्योगपती संजय कपूर सोबत अत्यंत थाटात लग्न केलं. करिश्माचं हे पाहिलं लग्न होतं तर संजय कपूरचं हे दुसरं लग्न होतं. अभिनेत्री करिश्माने फक्त पैसा बघून लग्न केलं असा आरोप त्यावेळी अनेक प्रेक्षकांनी करिश्मावर केला होता.
उद्योगपती संजय कपूर सोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री करिश्माने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आणि पतीसोबत सुखी संसारचे स्वप्न ती रंगवू लागली. पण हे स्वप्न जास्त दिवस टिकले नाही. करिश्माने पहिल्या पत्नीसोबत संजय यांचे संबंध असल्याचे आरोप केले तर संजयने ‘करिश्मा ही खूप पैसे उडवते आणि तिने फक्त पैसा आणि प्रॉपर्टी साठी लग्न केले’ असे आरोप केले. अभिनेत्री करिश्मा आणि संजय यांचे अगदी टोकाचे भांडण होऊ लागले. आणि यामुळेच पुढे त्यांचा लग्नाच्या 11 वर्षांनतर 2014 मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केला आणि 2016 मध्ये त्यांचा घटस्फोटही झाला. (Bollywood actress Karisma Kapoor and businessman Sanjay Kapur divorced after 11 years of marriage)

करिश्माचे पतीवर गंभीर आरोप
घटस्फोट घेतांना अभिनेत्री करिश्मा कपूरने तिचा पती उद्योगपती संजय कपूर याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. करिश्मा कपूरने तिच्या एका स्टेटमेंटमध्ये म्हटलं होतं की “एकदा सासूबाईंनी मला एक ड्रेस भेट दिला होता, पण मला तो फिट होत नसल्याने मी नाही घातला. त्यावेळी संजय कपूर आईला म्हणाला की ‘तू तिला मारत का नाही’, त्यावेळी संजयच्या या बोलण्याने मी खूप हैराण झाले होते”. असं करिश्मा कपूरने म्हटले.
पुढे अभिनेत्री करिश्माने पती संजयवर गंभीर आरोप करत असंही म्हटलंय की “हनीमूनला गेल्यावर संजयने मला त्याच्या मित्रासोबत झोपायला सांगितलं होतं आणि सर्वांसमोर माझी बोली लावून माझा अपमान केला होता”. असा गंभीर आरोप करिश्माने तिचा पती संजयवर केल्याने बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीज मध्ये एकच खळबळ उडाल्याची दिसली.
आताही काही मुलाखतींमध्ये अभिनेत्री करिश्माने पती संजयवर हेच गंभीर आरोप पुन्हा केले आहे. सध्याच्या आयुष्याबाबत अभिनेत्री करिश्माने एका मुलाखतीत म्हटलंय की “संजयसोबत नातं तुटल्यानंतर मी आयुष्यात खूप पुढे गेलेय. आता ‘समायरा आणि कियान’ या माझ्या मुलांसोबत मी आनंदात आयुष्य घालवतेय”. असं करिश्माने म्हटलंय.
संजय हा थर्ड क्लास माणूस
तसेच अभिनेत्री करिश्माचे वडील प्रसिद्ध अभिनेता रणधीर कपूर (Randhir Kapoor) हे सुद्धा संजय कपूरने करिश्मावर केलेल्या आरोपांमुळे प्रचंड संतापले होते. ते सुरुवातीपासूनच संजय आणि करिश्माच्या लग्नाच्या विरोधात होते. तसेच त्यांनी संजय कपूरला थर्ड क्लास माणूस असंही म्हटलं होतं.

करिश्माचे वडील अभिनेता रणधीर कपूर म्हणाले होते की “आमची प्रतिष्ठा सर्वांना माहीत आहे, आम्ही कपूर आहोत. आम्हाला कोणाच्याही पैशांच्या मागे धावण्याची गरज नाही. अभिनयाने आम्हाला फक्त पैसाच मिळाला नाही तर आमचे हे टैलेंट आम्हाला आयुष्यभर साथ देऊ शकते. संजय हा थर्ड क्लास माणूस आहे. करिश्माने त्याच्याशी लग्न करावे असे मला कधीच वाटले नाही. तो एक अय्याश आहे, आणि त्याने कधीही आपल्या पत्नीची काळजी घेतली नाही. तो तिची फसवणूक करून दुसऱ्या महिलेसोबत राहत होता. तो कसा आहे हे संपूर्ण दिल्लीला माहीत आहे. मला यापेक्षा जास्त काही बोलायचे नाही”. असं अभिनेता रणधीर कपूर म्हणाले होते.
अभिनेत्री करिश्मा पुन्हा अभिनय क्षेत्रात
उद्योगपती संजय कपूर सोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री करिश्माने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. पण आता घटस्फोट झाल्यानंतर तिने पुन्हा एकदा अभिनय करण्यास सुरुवात केली आहे. सध्या ती अनेक जाहिरातींमध्ये झळकत आहे. तसेच सध्या ती अनेक बॉलीवूड पार्ट्यांनाही हजेरी लावत असते. अभिनेत्री करिश्मा कपूर ही शेवटची 2006 मध्ये ‘मेरे जीवन साथी’ या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर आता घटस्फोट झाल्यानंतर करिश्माने पुन्हा अभिनय क्षेत्राकडे वळत ‘मेंटलहुड’ (Mentalhood) या चित्रपटाच्या माध्यमातून ओटीटी क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तसेच लवकरच तिचे अजून काही चित्रपट येणार असल्याचे म्हटले जात आहे.

पण सध्या मात्र अभिनेत्री करिश्मा ही तिने तिच्या पतीवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे खूप चर्चेत आहे. एकेकाळच्या अत्यंत लोकप्रिय अभिनेत्रीला तिच्या खऱ्या आयुष्यात अशा कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागले हे ऐकून तिच्या चात्यांनाही मोठा धक्का बसला.