Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसंदर्भात आता पडताळणी सुरु आहे, यात काही अपात्र आणि निकषात न बसणाऱ्या महिलांना या योजनेतून बाद करण्यात येत आहे, पण आता प्रशासनाकडून या बाद झालेल्या महिलांना पैसे परत करण्याचे मेसेज येत आहे, यामुळे अनेक महिलांना प्रचंड मनस्ताप झालाय. या महिलांनी आता आपल्याला मेसेज करून हा सर्व प्रकार सांगितला आहे, खरंतर एकीकडे महिला आणि बालविकास मंत्री सांगतात की पडताळणी नंतर ज्या महिला बाद होतील, त्यांना मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाही, फक्त त्यांना येथून पुढे लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही. असं आदिती तटकरे यांनी मिडियासमोर अनेकवेळा सांगितलं होतं, पण तरीही प्रशासनाकडून ज्या महिला बाद होत आहे. त्यांना पैसे परत करण्याचे मेसेज पाठवले जात आहे. ही महिलांची स्पष्ट फसवणूक आहे.
बरं हे पैसे परत करण्याचे मेसेज येत तर आहे पण यात पैसे नेमके कुठे परत करायचे याचा उल्लेख सुद्धा नाही. खरंतर लाडकी बहिण योजनेचे पैसे परत करायचे असल्यास तशी कोणतीही यंत्रणा सरकारने निर्माण केलेली नाही, मग असे पैसे परत करण्याचे मेसेज पाठवून महिलांना मनस्ताप का दिला जातोय.

पैसे परत करण्याचे मेसेज आल्यानंतर अनेक महिला खूप टेन्शन मध्ये आहे, त्या आपल्याला सतत मेसेज करत आहे, कारण हे पैसे कुठे परत करायचे यासंदर्भात त्यांना अजिबातही माहिती नाही, आणि आता आपल्यावर कारवाई होते की काय अशीही या महिलांना भीती आहे, तसेच यातील असंख्य महिला या गरीब घरातील आहे, त्यांच्याकडे आता परत करण्यासाठी पैसे नाही, त्यामुळेही या महिला परेशान आहे.
यातील काही महिला निराधार योजनेचा लाभ घेताय, त्यांनी लाडकी बहिण योजनेचा सुद्धा लाभ घेतला आहे, आता निराधार म्हणजेच ज्यांना कोणताही आधार नाही, त्यांच्या पतीचे निधन झाले आहे, अशा असंख्य गरीब महिला ज्यांना आर्थिक आधाराची गरज आहे म्हणून या महिलांनी लाडकी बहिण योजनेचे फॉर्म भरले, आणि त्यांचे फॉर्म निवडणुका होणार असल्याने घाई घाईत प्रशासनाने अप्रूव्ह सुद्धा केले. पण आता निवडणुका झाल्यानंतर याच लाडक्या बहिणी प्रशासनाच्या नावडत्या बहिणी ठरल्या आहे. त्यांच्याकडून आता पैशांची वसुली सुरु केली आहे. हे प्रशासनाचे कार्य अत्यंत चुकीचे आहे. असंख्य निराधार महिला गरिबीत जीवन जगताय, त्यांच्याकडे आता परत करण्यासाठी पैसे नाही.
जर या महिला पात्र नव्हत्या तर प्रशासनाने यांचे फॉर्म अप्रूव्ह करायलाच नव्हते पाहिजे. पण तेव्हा निवडणुका असल्याने महिलांचे त्यांना वोट हवे होते, आता निवडणुका झाल्या, त्यांना आता या महिलांची गरज राहिली नाही. म्हणूनच आता असंख्य महिलांना पैसे परत करण्याचे मेसेज पाठवून त्रास दिला जातोय. पण यात चूक फॉर्म भरणाऱ्या महिलांची नाही तर तो फॉर्म अप्रूव्ह करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची आहे. त्यामुळे सरकाने असंख्य गरीब महिलांना त्रास न देता जर पैसे परत घ्यायचेच असेल तर तर ते फॉर्म अप्रूव्ह करणाऱ्या सरकारी कर्मचार्यांच्या पगारातून कट करावे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मनमानी करत अनके महिलांना असे पैसे परत करण्याचे मेसेज पाठवल्याने या महिला घाबरल्या आहे, अनेक महिलांकडे सध्या परत करण्यासाठी पैसे नसल्याने कारवाईच्या भीतीने या महिलांनी टेन्शन घेतले आहे. तरी सरकारने या महिलांकडून पैसे परत न घेता त्यांना लाडकी बहिण योजनेतून बाद करून पुढील हफ्ते त्यांना पाठवून नये. यासंदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांना सक्त आदेश दिले जावे. कारण पुढे निवडणुकीला हे अधिकारी उभे राहणार नाही तर नेते उभे राहणार आहे. आणि महिलांना जर असा मनस्ताप दिला तर त्याचा बदला निवडणुकीत नक्की घेतील हे सरकारने विसरू नये.