मंदिरातून का हटवल्या जात आहेत साईबाबांच्या मूर्ती? जाणून घ्या साईबाबांचा इतिहास आणि नव्या वादाचं कारण | Sai Baba removed from Temple

Sai Baba removed from Temple

Sai Baba removed from Temple: साईबाबा हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी गावाचे सुप्रसिद्ध संत होते. देशभरात त्यांचे करोडो भक्त आहेत, आणि शिर्डीतील साईबाबांचे मंदिर जगभरातील भाविकांसाठी महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. रोज हजारो लोक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. शिर्डीतील साईबाबांची मूर्ती देशभरातील अनेक मंदिरांमध्ये स्थापन करण्यात आली आहे. परंतु वाराणसीसारख्या ठिकाणी, काही मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या जात आहेत. सनातन रक्षक दलाने हे पाऊल उचलत सफेद कपड्याने मूर्ती झाकून त्या मंदिरातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. (Why are idols of Sai Baba being removed from the temple? Know the history of Sai Baba and the reason for the new controversy)

शंकराचार्यांच्या विरोधानंतरचा संघर्ष

यापूर्वी शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनीही साईपूजेला विरोध दर्शविला होता. त्यांचा मते, साईबाबांना महात्मा म्हणून आदर देता येईल, पण त्यांची देवतेसारखी पूजा करणे योग्य नाही. या विवादाच्या पार्श्वभूमीवर, वाराणसीतील 14 मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात आल्या आहेत.

याबाबत Dr.Sachin Tripathi या x युजरने एक व्हिडिओ शेअर करत म्हटलंय की – “वाराणसी में सनातनी धर्मी हिन्दुओं के द्वारा शुद्ध वैदिक मार्ग पर चलने और किसी भी मानसिक वर्णसंकर मार्ग को त्यागने का प्रभाव देखने को मिला! बनारस के बड़ा गणेश मंदिर से साईं बाबा की प्रतिमा हटा दी गई! लोहटिया स्थित बड़ा गणेश मंदिर से सांई बाबा की मूर्ति को सर्वसम्मति के बाद हटा दिया गया है। साईं बाबा का सनातन हिंदू धर्म से दूर दूर तक कोई संबंध नहीं! जिसे साईं बाबा की इबादत करनी हो,वो गैर-हिंदू करे हिंदू धर्म अनुसार साईं बाबा की पूजा पूर्णतः वर्जित! जिसका वेद में कोई वर्णन नहीं हो,उन्हें भगवान तो छोड़ो,देवता भी नहीं मान सकते! और जिनकी कोई गुरु परंपरा अर्थात् उनके पहले गुरु के गुरु इत्यादि नहीं हो,उन्हें गुरु भी नहीं मान सकते! सांई बाबा की मूर्ति पर विवाद के बाद धीरे-धीरे शहर के अन्य मंदिरों से सांई मूर्ति हटाने के बात हो रही है।”

साईबाबांचा जन्म आणि त्यांचे जीवन

साईबाबांचा जन्म 1838 मध्ये महाराष्ट्रातील पाथरी या गावी झाला असे मानले जाते, परंतु त्यांच्या जन्मस्थळाबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या मूळ धर्मावरही वाद आहेत – काही लोक त्यांना हिंदू मानतात तर काही मुस्लिम. त्यांच्या शिकवणीमध्ये मात्र धर्मापेक्षा माणुसकीला अधिक महत्त्व दिलेले दिसते.

साईबाबा हे शिर्डीचे प्रसिद्ध संत होते, ज्यांनी संपूर्ण मानवजातीला प्रेम, सेवा आणि श्रद्धेचा संदेश दिला. साईबाबा यांचे खरे नाव, त्यांची जात वा धर्म याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही. साईबाबांचा जन्म कुठे झाला त्यांचे आई-वडिल कोण होते, याबाबत कोणालाच माहित नाही. कारण साईबाबा यांनी कधीच आपल्याबद्दलची माहिती कोणाला सांगितली नाही. केवळ एकदा एका भक्ताने खूप विनवणी केल्यानंतर साईबाबांनी आपला जन्म 28 सप्टेंबर 1836 मध्ये झाल्याचं सांगितलं. त्यामुळेच 28 सप्टेंबरला देशभरात साईबाबांचा जन्मत्सोव साजरा केला जातो.

साईबाबांच्या खऱ्या नावाबाबत बराच गोंधळ आहे. काही ठिकाणी त्यांचं नाव चांद मियाँ असल्याचं सांगितले जातं तर काही लोक त्यांना हिंदू मानतात.

साईबाबा पहिल्यांदा शिर्डीत साधारण 1858 साली आले. तेव्हा ते फकिरांच्या वेषात होते. त्यांनी आपले जीवन शिर्डी गावातच व्यतीत केले. प्रारंभी काही लोक त्यांना ओळखत नव्हते, परंतु कालांतराने त्यांच्या चमत्कारांमुळे आणि अध्यात्मिक मार्गदर्शनामुळे लोक त्यांना देवाचा अवतार मानू लागले. काही लोक साईबाबांना भगवान दत्तदत्तात्रेय मानतात तर काही लोक त्यांना भगवान शिवाचा अवतार मानतात. साईबाबा आपला बराचसा वेळ समाधीत घालवत.

साईबाबा यांनी धर्म, जात, वंश यापलीकडे जाऊन माणुसकीचा संदेश दिला. “सबका मालिक एक” म्हणजेच सर्वांचा ईश्वर एक आहे, अशी त्यांची शिकवण होती. त्यांनी भक्ती, श्रद्धा आणि सबुरी यावर नेहमीच भर दिला. त्यांचा भक्तांसोबतचा साधा संवाद, समाजातील गरिबांना मदत करणे, आणि रुग्णांची सेवा हे त्यांच्या जीवनाचे मुख्य अंग होते.

साईबाबांची समाधी आणि आजचा प्रभाव

साईबाबांनी 15 ऑक्टोबर 1918 रोजी शिर्डीत समाधी घेतली. त्यांचे समाधी मंदिर आजही लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. आजही लाखो भक्त शिर्डीत येऊन त्यांची समाधी दर्शन घेतात. त्यांच्या शिकवणीनुसार भक्ती, श्रद्धा आणि सबुरी या तत्त्वांवर आजही लोकांच्या जीवनाचा मार्गदर्शन होत आहे. पण आता या नव्या वादाचे शिर्डीत काय पडसाद उमटणार ते पाहणेही महत्वाचे ठरेल.

वादाचा धर्मशास्त्रीय आधार

नव्या वादावर बोलताना सनातन रक्षक दलाने शास्त्रांचं कारण दिलं आहे. त्यांच्या मते कोणत्याही मंदिरात मृत मानवाची मूर्ती बसवून पूजा करणे निषिद्ध आहे, हिंदू मंदिरांमध्ये केवळ पाच देवतांची पूजा करण्याची परंपरा आहे – सूर्य, विष्णू, शिव, शक्ती, आणि गणेश. मृत व्यक्तींच्या मूर्तींची पूजा करणे धर्मविरुद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळेच त्यांनी साईबाबांची मूर्ती मंदिरातून हटवण्याचा निर्णय घेतला.

या सर्व प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय? ते आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा..

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top