‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरुची अडारकर लग्नबंधनात अडकली आहे.

तिचे अभिनेता पियुष रानडे याच्या सोबत लग्न झाले आहे.

अभिनेत्री सुरुची अडारकरने 2006 मध्ये सिनसृष्टीत पदार्पण केले.

'पेहचान' या मालिकेत ती झळकली. त्यानंतर तिने ‘अवघाची संसार, ओळख, एक तास भुताचा, आपलं बुवा असं आहे’ या मालिकांमध्ये काम केले.

पण यानंतर झी मराठी वरील ‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे तिला खरी प्रसिद्धी मिळाली.

त्यानंतर सुरुची ही ‘अंजली झेप स्वप्नांची’ या मालिकेत झळकली होती. सध्या सुरुची ही ‘छोट्या बयोची मोठी स्वप्न’ या मालिकेत झळकत आहे.

तर दुसरीकडे अभिनेता पियुष रानडे हा देखील मराठी मधील प्रसिद्ध अभिनेता आहे.

पियुष हा सध्या ‘काव्यांजली’ या मालिकेत विश्वजीतच्या भूमिकेत झळकत आहे. 

 याआधी तो ‘अंजली झेप स्वप्नांची’ या मालिकेत झळकला होता. 

अभिनेता पियुष रानडेचे हे तिसरे लग्न आहे.

याआधी तो अभिनेत्री शाल्मली टोळ्ये आणि मयुरी वाघ यांच्याशी लग्नबंधनात अडकला होता.

मात्र, लग्नाच्या काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला.

तर अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे यांचे लग्न झाल्याबद्दल अभिनंदन आणि सुभेच्छा.